निसर्ग चक्रीवादळ नुकसानीवर मात करण्यास वीज कंपन्या सज्ज !: डॉ.नितीन राऊत

निसर्ग चक्रीवादळ नुकसानीवर मात करण्यास वीज कंपन्या सज्ज !: डॉ.नितीन राऊत


नियंत्रण कक्ष स्थापन, संचालक दर्जाचा नोडल अधिकारी ठेवणार घडामोडींवर लक्ष


प्रभावित क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यास मनुष्यबळाला निर्देश


वीज ग्राहकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे


मुंबई : ४ जून २०२० ३ व ४ जून २०२० रोजी येणाऱ्या अति तीव्र "निसर्ग" चक्रीवादळामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीच्या मालमत्तेस भरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे.चक्रीवादळादरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यास थोडा वेळ लागू शकतो याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, तिन्ही वीज कंपन्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून संचालक दर्जाचा नोडल अधिकारी नेमला आहे. तसेच नियंत्रण कक्षाद्वारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. वादळ प्रभावित भागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दक्षतेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व त्यांची यंत्रणा यांना वादळानंतरच्या परिस्थितीशी मुकाबला करण्याच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबुन असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, घाबरू नये प्रशासन आणि वीज कंपन्या आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, अशी माहिती राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. डॉ. राऊत पुढे असे म्हणाले की, "निसर्ग" वादळाचा आवाका लक्षात घेता, हवेचा वेग बघून, आवश्यकतेनुसार अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. अश्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अत्यावश्यक सेवा जसे हॉस्पिटल प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, जेणेकरून कोणाच्या जीविताला हानी पोहचणार नाही. वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने केंद्र सरकारने वीज या घटकाला एन.डी.आर.एफ. (राष्ट्रीय आपदा निवारण निधी) मध्ये समाविष्ट करून राज्यातील वीज कंपन्याना तातडीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करावी कारण कोरोना, लॉकडाऊन आणि आता "निसर्ग" वादळ या कठीण परिस्थितीतुन लवकर बाहेर निघायचे असेल तर कर्जा ऐवजी केंद्र सरकारने अनुदान देऊन आधार द्यावा अशी मागणी डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे.


Popular posts
अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी
Image
पोलीस हवालदार आकाश तुझा आम्हाला अभिमान वाटतो -गृहमंत्री अनिल देशमुख
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावेत - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पास वाटप ६ लाख ०५ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ३८ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख
‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई